Search This Blog

Friday, July 10, 2020

लालच में..



दाना उठाने की चक्कर में
पंछी अटक गये जाल में
कुछ चतुराई से उड़ गये
तो कुछ वही लटक गये

कितनो ने भरा अपना पेट
तो कोई बन गया मानो सेठ
इनकी उलटी सीधी कसरत ने
शिकारी भी आ गया हरकत में

ऐसा जाल बिछाया
लालच में सबको फ़साया
तड़पते रहे उड़ जाने को
कोई नहीं आया बचाने को

समेट ने गया दुसरो का
वो पंछी घर का न घाट का
हक़ की मिले तो खाये
वही पंछी चैन से सो पाये

- राणी अमोल मोरे


Thursday, July 9, 2020

सफल व्यापारी

लोग पुँछते है
कैसे कमा लेते हो
हर चीज में सोना
कैसे तराश लेते हो
मै मुस्कुराके छोटासा
जवाब देता हूँ
मै भी आप जैसा ही
आम इंसान हूँ
बस थोड़ा
सोचता अलग हूँ
और सोच लिया तो
करता जरूर हूँ
जब नुकसान से
दुनिया डर जाती है
खुदको बचाने के लिए
पीछे हट जाती है
मेरी अनोखी सोच
वहीं से शुरू होती है
सफलता की पहली
सीढ़ी बन जाती है
मै अपना रास्ता
अलग चुनता हूँ
ठोकर खाकर
खुद ही संभलता हूँ
असफलता का डर
मै पालता नही
क्योंकि मेरा रास्ता
होता है सही
मेरी मेहनत ही
मेरा वजूद है
मेरी सफलता ही
उसका सबुत है
मेरे सपने ही
मेरा रहस्य है
आपको लगता है
वजह कोई और है
जब आम लोग
हजारो की सोचते है
तब मै करोडो में
खेलता हूँ
लोग जिंदगी
गवाँ देते है
मै पल में
समेट लेता हूँ
मेरा काम
मेरे वक्त की
कीमत तय करता है
आप का तो वक्त भी
कोई और खरीद लेता है
अपनी लगन से
मै बन जाता हूँ
सफल व्यापारी
तो लोग सोचते हो
मै पड़ गया
उन सब पे भारी
बस यही तो
बेतुकी बात है
जिसमें लोग
समय गंवाते है
मुझे औरों से
अलग दिखलाते है
खुद हाथ पर हाथ
धरे रहते है
अपने कर्म को छोड़
नसीब को कोसते है

- राणी अमोल मोरे

Central Pension Processing Centre: Latest News & Videos, Photos about  Central Pension Processing Centre | The Economic Times

Wednesday, July 8, 2020

वो दिये जला के..


बारिश बूंदों में बरस जाती है
हमारा ध्यान भी नहीं होता
वो मिट जाते है दूसरों के लिये
हमें पता भी नहीं होता

जब हम थे गहरी नींद में
वो दिये जला के चले गये
लाख कोशिश की बदलने की
पर हम जैसे के वैसे रह गये

रास्तें में कंटक मिलेंगे
उन्हें भी शायद पता था
बिछानेवाले अपने ही होंगे
यह शायद सोचा नही था

उनकी हँसी के अंगारे ऐसे चलें
की अपने ही पराये बन गये
उनको सजदा करे दुनिया सारी
हम तो मानों बेगाने बन गये

वक्त हमने वहाँ बिताया
जहाँ हमारा कोई काम नही था
झूठो का डंका खूब बजाया
पर जुँबा पर सच्चों का नाम नही था

- राणी अमोल मोरे

Tuesday, July 7, 2020

मशागत मनाची अन बुध्दीची निवडलेल्या ध्येय प्राप्तीची

आनंदाच्या क्षणात विसर पडला, तरीसुध्दा त्यावेळी सुप्त अवस्थेत असतेच, ते मनाच्या कोप-यात कुठेतरी दडलेलं. शिंपल्यात मोतीच जणू, शांततेत, चिंतनात, मनात, ओठांवर, डोळ्यात अगदीच सर्वत्र पसरलेलं, दुसरं तीसरं काही नाही, माझं ध्येय, माझं स्वप्न.
 
प्रत्येक सृजनशील मनुष्याचे काही स्वप्न, काही ध्येय असतात. जेव्हा मनुष्याला स्वप्न दिसायला सुरुवात होते तेव्हा तो बरीच स्वप्ने बघतो. मोठया मानसाची स्वप्ने देखील मोठी आणि इतरांपेक्षा वेगळी असतात. स्वप्न आणि ध्येय जेव्हा एक होतात तेव्हा ते झोपेत दिसनारी स्वप्ने राहत नाहीत, तर ती झोप उडवणारी स्वप्न म्हणून ओळखली जातात. मनुष्य जेव्हा माझं ध्येय, माझं स्वप्न याबद्दल विचार करायला लागतो तेव्हा जणू त्याची अवस्था एखाद्या निरव्यसनी मनुष्याने व्यसन करण्याचा विचार मनात आणावा अगदी तशीच काहीशी झालेली असते. कारण व्यसन करायच किंवा लावायच म्हणजे नशा हा जोडीला असनारच, त्याचप्रमाणे या ध्येय आणि स्वप्नांचा सुध्दा नशा येणारचं. मग त्या निरव्यसनी माणसाने सुरुवातीला व्यसनासाठी प्रोत्साहीत होऊन हळुहळु त्या व्यसनाला अंगीकारायचं. सुरुवातीला त्याचं शरीर आणि मन त्याला एकरूप होत नाही परंतु जसा-जसा वेळ जातो, तसा-तसा तो व्यसनाधीन होत जातो. मग एकदा का तो पूर्णपणे व्यसनात बुडाला की त्याला त्याच्या शरीराची, मनाची किंवा इतर कुठल्याच गोष्टीची विशेष गरज किंवा काळजी वाटत नाही. अगदी त्याचप्रमाणे मनुष्याच्या या ध्येय आणि स्वप्नांच्या बाबतीत होते. हळुहळु आपली स्वप्ने, आपली ध्येये या मार्गाने एकदा का तो लागला की तो फक्त त्यातच एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आजु बाजुला काय चालु आहे यात तो विशेष लक्ष देत नाही. ध्येय पुर्तीसाठी जे कष्ट, सोसावे लागतात शरीराला त्या वेदना जाणवतच नाही, कारण त्या ध्येयांचा आणि स्वप्नांचा नशा त्या वेदना जाणवूचं देत नाहीत.

मनुष्याचे मन विचाराने परिपक्व झाले की तो एक ध्येय आणि एक स्वप्न परीपुर्ततेसाठी निश्चित करतो. निश्चित ध्येय व स्वप्न साकारतांना झालेल्या कष्टातुन जी अशांतता निर्माण होते ती अशांतता निश्चित ध्येय व स्वप्न साकारतांना उच्च कोटीचा आनंद, आत्मसन्मान, विशालता, परिपक्वता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसीक समाधान या सर्व गोष्टी शिकवून जाते. म्हणून ध्येय व स्वप्नांची निवड मनाने आणि तर्कशुद्ध बुद्धीने केलेली असली पाहिजे कारण त्याच दिशेने आपले मन, बुध्दी आणि शरीर धावत सुटते. हे सर्व साकारतांना भौतीक परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी या मन, बुध्दी आणि शरीर यांच्या एकत्रीतपणामुळे त्याचा विशेष परिणाम होत नाही. मग अश्या प्रतीकुल परीस्थितीतून सुध्दा ध्येय आणि स्वप्नाने ग्रासलेला प्रत्येक मनुष्य समाधानी, शांत आणि सुखाचा अनुभव नक्कीच घेतो. 

कधी कधी हे सर्व सुरळीत चालु असतांना म्हणजे ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करतांना एक रस्ता निवडला, नंतर जाण्यासाठी कुठले साधन बरोबरीला घ्यायचे, कुठल्या वेगाने जायचे किंवा कुठे वेग वाढवायचा आणि कुठे कमी करायचा या सर्व गोष्टी शिकून झाल्या असतांना अचानक अनुकुल परिस्थिती प्रतिकूल परिस्थितीत बदलून जावी अशी एखादी घटना घडते. एखादवेळी त्या घटनेची तीव्रता ऐवढी जास्त असते की मन, बुद्धी आणि शरीर या तीनही गोष्टींना विचलीत करण्याची शक्यता निर्माण करते. ती एका महत्त्वाच्या कारणामुळे प्रभाव करुन जाते ती म्हणजे त्यावेळची त्या मनुष्याची आर्थिक, सामाजिक परिस्थिती. मग इथेच सर्व थांबणार किंवा थांबवावे लागणार असा विचार त्याच्या मनात शिरकाव करू लागतो. त्यावेळी बुध्दी त्यावर आणखी जोर लावून त्या दिशेने शरीराला कामाला सुरुवात करते. 

म्हणजे ही वेळ अशी असावी, जणू तो व्यसनात बुडालेला व्यसनाधीन त्याला कोणी अचानक जागे करावे आणि त्याच्या वर्तमानातील गोष्टींसाठी त्याने व्यसन करणे थांबवावे मग त्याचं मन, शरीर आणि बुध्दी हे तिन्हीही वेगळे आहेत याची त्याला प्रथमच जाणीव व्हावी तसेच काही तरी. परिस्थितीच्या रोषामुळे वर्तमान गरजेपोटी तो ह्या सर्व गोष्टी थांबवेलही. परंतु तो मनुष्य खऱ्या अर्थाने जगू शकणार नाही. कारण त्याचा जगण्याचा खरा आनंद त्या व्यसनातील नशेत दडलेला असतो. तो तिथे सर्व जग विसरुन कुठल्याही शारिरीक वेदनांचा त्रागा न करता शांत असतो. परिस्थितीच्या गरजेपोटी तो आपल्या मनाच्या ध्येयाकडे जाणाऱ्या रस्त्याने जायचे थांबवतो देखील परंतु, त्याने ज्या जगण्यात रस घेतलेला असतो व त्यातील आनंद आता त्याला मिळणार नसतो त्यामुळे त्याच्या मनाची, शरीराची आणि बुद्धीची अगदी दिशाचं बदलून गेलेली असते. जेव्हा मनुष्याने ध्येय प्राप्तिसाठी एखादा मार्ग निवडलेला असतो आणि त्या मार्गाने, त्या दिशेने सम ध्येयाचे काही इतरही लोक त्याला दिसतात त्या वेळेला हा परिस्थितीमुळे ध्येयापासून दूर गेलेला त्यांना अनुभवातून आणि त्याने योजलेला योग्य मार्ग दाखवून चालायला सांगत सुटतो. परंतु,सत्य हेच असते की जास्त वेगाने तोच धाव घेतो जो आपल्या ध्येयाशी आणि स्वप्नांशी एकरुप असतो. जणू काही एकरुप मनुष्य ह्या शर्यतीतला भरधाव धावनारा ससा तर इतर कासवे

ध्येय आणि स्वप्नांचा त्याग करून गरजेपोटी निवड केलेल्या मार्गाने हा एकरुप मनुष्य चालत सुटतो. त्याला वाटते काही विशेष फरक पडणार नाही माझी खरी स्वप्ने सुटलीत तरी माझी गरज हीच आहे, ज्या मार्गावर मी आज चालतो आहे. मग हळुहळू तो त्याची ध्येये आणि स्वप्ने विसरायला लागतो आणि आहे त्या परिस्थितीत किंवा त्या जाणा-या मार्गावरच आनंद, समाधान, सुख या सर्व गोष्टींचा शोध घ्यायला लागतो. कधी कधी त्याला उगाच भास होतो की तो त्या मार्गानेही आनंदी आणि समाधानी होऊ शकतो पण तो फक्त भासच उरतो. परंतु, मनाने निवडलेलं ध्येय आणि स्वप्न त्याचा पाठलाग सतत करतच राहतात. त्याला विसर पडत नाही आणि तो ज्या मार्गाने जात असतो त्यावर तो परत परत त्याच पूर्वीच्या ध्येयाला आणि स्वप्नांना बघत सुटतो. कारण त्याचा खरा आनंद त्यातच दडलेला असतो. मग अशा वेळी जर त्याला हे कळले की ती कासवे आज त्याच्या पुढे निघुन गेलेली आहेत, तर मग त्या मनुष्याच्या मनातील अव्यवस्थेला काही सीमाच उरत नाही. त्यावेळेला त्याचं मन, बुध्दी आणि शरीर काहीतरी गमावलय या भावनेत बुडून त्याचा उजाळा वारंवार करत राहते. 

आता येथूनचं आपण आपल्या ख-या विषयाकडे वळूयात. मनाच्या व बुध्दीच्या मशागतीचा. परंतु, त्याचं तर तारतम्यचं नाही. लागेल नक्कीच लागेल. ते असं की जर एखादा मनुष्य ख-या अर्थाने त्याने निवडलेल्या ध्येयाचा व स्वप्नांचा विचार दिवस-रात्र करत असेल आणि त्याचं संपुर्ण सुख, मनाचे समाधान आणि मन:शांती जर ख-या अर्थाने त्याच निवडलेल्या ध्येयात गुरुफटलेली असेल तर तो नक्कीच त्या ध्येयापर्यंत आणि स्वप्नांपर्यंत पोहोचणार. त्यासाठी त्याला एकचं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे निवडलेल्या ध्येयावर संपुर्ण लक्ष केंद्रीत करणे व त्याचबरोबर वाटेल ते परिश्रम घेण्याची तयारी. ह्या सर्व गोष्टी करतांना त्याला सर्वप्रथम गरज आहे ती त्याच्या मनाच्या व शरीराच्या मशागतीची. ज्याप्रमाणे उत्तम जोमदार पीक मिळवीण्याच्या ध्येयाने शेतकरी आपली जमीन ही चांगल्या मशागतीने कसतो, त्याचप्रमाणे योग्य त्या ध्येय प्राप्तीसाठी मनाची अन बुद्धीची योग्य मशागत होणे अत्यावश्यक आहे. ही वेळ पेरणीची नसुन ती मशागतीची आहे. ह्या वेळेला तुम्हाला सर्व क्रिया जमीनीवर करुन पुर्णपणे तयार राहायचे आहे. एकदा का पाऊस पडला की या कसलेल्या जमिनीतून तुम्ही निवडलेले बीज पेरले अन् त्या पीकाची योग्य रितीने काळजी घेतली की जोमदार पीकाचे ध्येय नक्कीच पुर्ण होणार. म्हणून मनुष्याने एकदा का आपल्या ध्येयाची बीजे कसलेल्या मनात पेरली, त्याची योग्य मशागत व त्यावर योग्य ते परिश्रम घेतले आणि त्याला संयमाचे आणि चिकाटीचे खतपाणी घातले की मनाने निवडलेल्या ध्येय प्राप्तीला उशीर मुळीच लागणार नाही. तसेच ती ध्येयप्राप्ती तुम्हाला नक्कीच तो संपुर्ण आनंद, समाधान द्विगुनीत करुन देईल ज्याची मनाने तुमच्यासाठी निवड केलेली होती. म्हणून परिस्थितीच्या गरजेपोटी अडकलेल्या ध्येय व स्वप्नांना पूर्णपणे थांबवण्यापेक्षा, विसरण्यापेक्षा योग्य वेळ येईपर्यंत एक थांबा (पॉज) घेऊन नवीन सुरवात (रिस्टार्ट) करणे गरजेचे आहे. या मध्यंतरातील काळात आपल्या मनाची व बुद्धीची योग्य मशागत आपल्या ध्येय व स्वप्नांना लागणाऱ्या गोष्टींची जमवाजमव करून एकत्र सांगड घालून करावी. जेणेकरून हा थांबा देखील आपल्याला एक नवीन उत्साहवर्धक सुरवात करण्यास प्रवृत्त करेल आणि आपण स्वत: निवडलेले आपले ध्येय व स्वप्न साकार करण्यास मदत करेल. 

- राणी अमोल मोरे


Sunday, July 5, 2020

..आँखे बंद कर ली है


हाँ जी हाँ मैंने तो आँखे बंद कर ली है
अंधकार का मुझपर चढ गया ऐसा नशा
मै तो भूल गई उजियाला और शीशा
कही अनकही के अंध विश्वास से से सँजोया
मै तो भूल गई मेरा आत्मविश्वास है खोया
इसीलिए, हाँ जी हाँ मैने तो आँखे बंद कर ली है

सच्चाई और गहराई से मुझे क्या लेना
मैंने तो झूठ को ही अपना ख़ुदा है माना
उसी ख़ुदा से जुड़े रहने का मन मे है ठाना
पर उसके न होने का सच मुझे नही मानना
इसीलिए, हाँ जी हाँ मैने तो आँखे बंद कर ली है

झूठ के अंधकार के सामने हाथ फैलाकर
मन्नत मांगती हूँ मेरा सदा भला ही कर
मन के प्रश्नो को कभी न देखा सुलझाकर
शांति कैसे मिलेगी ख़ुद को ही डराकर
इसीलिए, हाँ जी हाँ मैने तो आँखे बंद कर ली है

दूसरों का भला अब मुझे चुबने लगा है
किसी की अच्छाई को कभी सराहा नहीं है
पर बुराइयों पर ताना मारना छोड़ा नहीं है
मेरे विचारों की नय्या अंधकार में तैर रही है
इसीलिए, हाँ जी हाँ मैने तो आँखे बंद कर ली है
- राणी अमोल मोरे 

Saturday, July 4, 2020

..माझा देव आहे


मूठभर धान्य पेरून
पोटभर अन्न देणारा
बळीराजा माझा देव आहे

देशासाठी छातीवर गोळ्या खात
क्षत्रूचं भक्षण करणारा
सैनिक माझा देव आहे

ज्ञानाची कवाडे उघडून 
सर्वांगीण विकास दाखवणारा
खरा शिक्षक माझा देव आहे

बुद्धीच्या कक्षा विस्तारून
जगणं सुखमय करणारा
संशोधक माझा देव आहे

स्वत:च्या अंगावर आजार घेत
सर्वांना उपचार देणारा
आरोग्य कर्मचारी माझा देव आहे

घाणीची गटारं साफ करून 
परिसर स्वछ ठेवणारा 
सफाई कामगार माझा देव आहे

जीवाचं रान करून
प्रामाणिकपणे काम करणारा
लोकसेवक माझा देव आहे

वनराईचे महत्व जाणून
वृक्षारोपण व संगोपन करणारा
वृक्षमित्र माझा देव आहे

पर्यावरणावर प्रेम करून
त्याचे अस्तित्व टिकविणारा
निसर्ग प्रेमी माझा देव आहे

प्राणिमात्रांवर प्रेम करून 
त्यांचे स्वातंत्र्य जोपासणारा
प्राणीमित्र माझा देव आहे

श्रीमंत आणि गरीब भेद न करता
सर्वांना सामान वागणूक देणारा
प्रत्येक नागरिक माझा देव आहे

गोर गरिबांच्या प्रश्नांसाठी
वाचा बनून लढणारा
समाजसेवक माझा देव आहे

माझ्या देवाची इतकी सुंदर रुपं
ज्यांनी ज्यांनी स्विकारली
तो प्रत्येक मनुष्य माझा देव आहे

- राणी अमोल मोरे

      

Saturday, June 27, 2020

वारी - परंपरा तीच रस्ता नवा


वारी ही अनेक शतकांपासून चालत आलेली धार्मिक, सांस्कृतिक आणि काही प्रमाणात भावनिक परंपरा आहे, जी बदलत्या काळानुसार देखील आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात तशीच जपलेली आहे. विठ्ठल हे महाराष्ट्राचं आद्य दैवत. परंतु तसा तो गोर गरिबांचा दिन दुबळ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. वारी या शब्दाकडे बघण्याचे दोन ठळक दृष्टिकोन आपल्याला सहज लोकमानसात बघायला मिळतील. एक म्हणजे तो वर्ग आहे जो आधुनिकतेच्या आणि प्रबोधनाच्या वाटचालीकडे वळू पाहतो व त्याच्या नजरेतून वारी ही कदाचित भोळी श्रद्धा आणि प्रदूषणाची एक लहर असू शकते. तर दुसऱ्या बाजूने एक वर्ग आहे जो आधुनिकतेला हळूहळू आत्मसात करणारा परंतु वारी ही त्याचा ‘जीव की प्राण’. ज्यामध्ये आपली संस्कृती, आपली माणसं आणि प्रत्यक्षात कधीही न दिसणाऱ्या पण एका वेगळ्याच काल्पनिक उच्च कोटीच्या भावनिक श्रद्धेने वारीच्या गर्दीत विठ्ठलाला शोधणाऱ्या ग्रामीण भागातील वर्गाचा समावेश होतो. काही तुरळक जनता अशीही असेल ज्यांना वारी तर हवी परंतु प्रदूषण किंवा आंधळा विश्वास नको अशी म्हणणारी. या सर्व घटकांचा एक सुवर्णमध्य काढण्याचा विचार आपण या लेखात पाहुयात.

चला तर मग वारीचे थोडे विश्लेषण करूया;
साधारणतः वारीला जाणारा जो वारकरी संप्रदाय आहे तो ग्रामीण भागातील आहे, असं पूर्णपणे म्हणता येणार नाही. कारण मुंबई, पुणे व पर राज्यांसहित परदेशातील भाविक मंडळीही वारीत सहभागी होत असल्याचे आपल्याला ठाऊक आहे. खूप नाही परंतु शहरी भागातील भाविकांचा सहभाग ग्रामीण भागातील भाविकांपेक्षा थोडा कमीच असतो. हे विश्लेषण या करीता, कारण वारीचा जो नवा रस्ता आपण बांधणार आहोत, त्यात यांचा सहभाग फार मोठा असणार आहे. वर्षानुवर्षे वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या वाढतांना आपण वृत्त वाहिन्यांवर ऐकत आणि बघत सुद्धा असतो. प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवते एखाद्या चांगल्या व परिवर्तनवादी सुरवातीसाठी जनमाणसं एकत्र जमविणे फार कठीण आहे. आपलं हे कठीण काम विठ्ठल त्याच्या वारीच्या रूपातून कित्येक वर्षांपासून पूर्ण करीत आहे, फक्त गरज आहे ते आपण जाणण्याची. दरवर्षी पंढरपूरला जाण्यासाठी भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो रस्त्यांवरून पैदल प्रवास करून येत असतात आणि या प्रवासा दरम्यान हे भाविक ठिकठिकाणी मुक्काम देखील करतात. त्यांच्या ह्याच पद्धतीचा वापर आपण प्रबोधन आणि ज्ञान संवर्धनासाठी करायला पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी वर्ग, शहरी भागातील सामान्य मजूर वर्ग आणि देश विदेशातील आपल्याकडील सर्व सुख सोयीचा त्याग करून मन:शांतीसाठी आलेला परदेशी वर्ग एकंदरीत वारकरी हा आपला जमाव असणार आहे.
 
पंढरपूरला जाणारे सारे रस्ते ज्या ज्या मार्गाने वारकरी पंढरी गाठतो ते सर्व आपल्या ज्ञान संवर्धनाचे प्रभोधनाचे व आधुनिक जगाचा स्वीकार करण्याचे मार्ग ठरू शकतील. जसे की अनेक शेतकरी आत्महत्येला बळी पडतात, अश्या शेतकरी वर्गाला वारीच्या माध्यमातून जागोजागी कृषी प्रदर्शन्या भरवून शेतकऱ्यांसाठी शासनाने कोण-कोणत्या योजना आखल्या, त्यांचा फायदा कसा घ्यायचा याची इत्यंभूत माहिती तथा आधुनिक तंत्रज्ञानाला अवगत करून मार्गदर्शन करून देण्याची सोय उपलब्ध करून देता येईल. त्याच बरोबर वारकऱ्यांचा जिथे जिथे मुक्काम किंवा थांबा असतो अश्या ठिकाणी ग्रामीण भागातील लघु उद्योगांना, बचत गटांना, शेतकऱ्यांच्या समूहाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आपले स्टॉल उभारणीसाठी शासनाच्या किंवा खाजगी सहभागातून मदत करता येईल. देवाच्या दानपेटीत मोकळ्या हातांनी दान करणाऱ्या श्रीमंत वर्गाचा सहभाग देखील या वारीचा रस्ता दुरुस्ती तथा सुशोभीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी घेता येईल. ज्यामधून एक सामाजिक सलोखा तयार होऊन गरीबी व श्रीमंतीची दरी थोडी कमी होण्यास मदत होईल. हे सर्व करीत असतांना शहरी भागातील सामाजिक संस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा राहणार असल्याने गाव किंवा तालुका पातळीवर त्यांचे दायित्व निर्धारित करून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विकासात्मक कार्यात त्यांचा सहभाग वाढवता येईल.
 
विठ्ठलाच्या दारी पोहचेपर्यंत वरिल बाबींचा अवलंब केल्यास प्रत्येक वारकरी हा ज्ञानाने आणि माहितीने समृद्ध झालेला असेल. ज्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्राची समृद्धी, दबदबा हा तेथील लोकांच्या वागणुकीवरून ठरत असतो व त्या करिता त्या क्षेत्रातील प्रत्यक माणूस हा प्रशिक्षणाने व शिस्तीने तयार केला जातो. त्याचप्रमाणे जर आपण विठ्ठलाला आपलं महाराष्ट्राचं आद्य दैवत आणि वारीला आपली संस्कृती मानत असू तर तेथे जाणारा प्रत्येक वारकरी ज्ञानाने संप्पन, कर्तबगारीने समृद्ध आणि सामाजिक जाणिवांनी व स्वछतेच्या सवयीने प्रशिक्षित केलाच पाहिजे. म्हणूनच विठ्ठलाचं घर व तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग आपण ज्ञान संवर्धनाचे, सामाजिक बांधिलकीचे, विकासाचे व स्वच्छतेचे प्रतीक बनविले पाहिजे जेणेकरून ‘एक समृद्ध देवस्थान एक समृद्ध महाराष्ट्र’ अधोरेखित करेल. जेव्हा विठ्ठलाचे हे लाडके वारकरी त्याच्या गळाभेटीला समोर उभे ठाकतील तेव्हा त्यांच्या मुखावर प्रसन्नता आणि समाधान असेल आणि ते बघून विठ्ठलही अंतर्भावातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि वारीच्या संस्कृतीला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देईल. 

- राणी अमोल मोरे


(आजचा लेख भविष्यातील लघुकथा)

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts