Search This Blog

Monday, June 1, 2020

महिलांची तारेवरची कसरत – एक सर्कस


महिलांची तारेवरची कसरत – एक सर्कस 


हा संवाद माझ्या समस्त भगीनींसाठी आहे, ज्या नेहमीच सर्कसी प्रमाणे तारेवरची कसरत करीत असतात.
           सर्कस माहीतच आहे सर्वांना. सर्कसीच्या एका प्रयोगाचा वेळ कमीत कमी १ तास तर जास्तीत जास्त ३ तास असेल कदाचित. सर्कस चालवणारा जो प्रमुख असतो तो ठरवत असेल दिवस भरातून किती प्रयोग करायचे ते. आपण गृहित धरु एका दिवसाला दोन किंवा तीन प्रयोग पूर्ण होतात आणि ही सर्कस  एखादया शहराच्या / नगराच्या ठिकाणी आली की राहत असेल एखादा महिना कमीत कमी. नाही का ? अशा कितीतरी शहरात तंबू बसत असतील. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की प्रत्येक प्रयोगला जवळपास ९५% प्रेक्षक हे नवीन असतात, त्यात ५% फक्त प्रेक्षक परत सरकस पहायला येत असणार. त्यांच्यासाठी सरकसमधील प्रत्येक खेळ हा नवीनचं, प्रथमचं बघितलेला. त्यांना कंटाळा येण्याच कारणचं काय. पण कोणी ह्या प्रेक्षकांपैकी विचार केला का, की हे जे समोर तासण-तास खेळ दाखवणारे आहेत. त्यात जोकर, काही माणसे, महिला, छोटी मुले/मुली आणि प्राणी सुध्दा यांना या सर्व गोष्टींचा किती कंटाळा येते असेल. हा विचार यासाठी करा म्हणत नाही की त्या खेळ दाखवणा-यांना मग गप्प बसु दया आणि तुम्ही तसेच जा तसेच तर यासाठी म्हणते की जर एखादया वेळी तुम्हाला असं आढळल की कोणी त्यापैकी थोडं लक्ष देऊन करत नाही. किंवा एखादया वेळी तारेवरचीची कसरत करताना खाली कोसळला तर तुम्ही त्यांच्यावर पांढरीशुभ्र बत्तीसी काढून हसणं आधी थांबवाव आणि हे होत नसेल तर त्यांना शिव्या देणं तर आपण नक्कीच थांबवू शकतो ना. बघतांना फार मजा वाटत असली तरी करायला फार कठीण असतं ते, तुम्हाला नाही कळायचं कारण ‘पाण्यातला मासा, झोपी जाये कसा, जावे त्याच्या वना, तेव्हा कळे.’
            आपल्या ह्या सोंगाड्या आणि अर्थहीन कृत्याला काही अर्थ जरी नसला, तरी देखील त्याचा परिणाम मात्र वाईटचं होतो, कारण ह्या बघ्या प्रेक्षकांच्या समोर हे जे सादरकर्ते असतात ते प्रत्येक प्रयोगाला आपला जीव मुठीत धरून, सर्व शक्ती पनाला लावून हे सर्व खेळ करत असतात. प्रत्येक खेळ आणि सादरीकरण हे नेहमी उत्तम व्हावे हाच त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो, पण अशा वेळेस एखाद्याचा थोडासा जरी तोल गेला की त्यांना त्यांच्या या चुकीबद्दल वाईट वाटलेच पण ह्या बघ्यांच्या हसण्याने किंवा शिव्या देण्याने ते आणखी अस्वस्थ होतात. त्यामुळे हवी तशी एकाग्रता त्यांना मीळू शकत नाही आणि मग त्यांच्या हातून संपुर्ण खेळ संपेपर्यंत अशा चुका होत राहतात. यासर्व गोष्टींमुळे सादरकरत्यांना आपल्या सादरी करणाबद्दल समाधन तर वाटतच नाही परंतू बघ्यांची सुध्दा निराशा होते, म्हणजे थोडक्यात काय तर  नुकसान दोन्हीकडे. यासर्व प्रकारातून बघ्यांनी काय शिकायलास पाहिजे? किंवा कोणती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे? खेळ सादर करणारे देव नाहीत, ते सुध्दा आपल्यासारखीच माणसे आहेत आणि चुका ह्या माणसाच्याच हातून होतात, देवाच्या नाही. मग एखाद्या वेळेस कुणाकडून चुक झाली तर त्याला प्रोत्साहन द्यावं यासाठी की त्याने परत जोमाने उठून उर्वरित खेळ अगदी उत्तम रित्या कुठल्याही चुका होऊ न देता सादर करावा, जेणे करुन त्यांचे मनोबल खच्ची न होता ते आणखी वाढेल आणि तो अधीक जोमाने, आत्मविश्वासाने आणि तुमच्या आदरापोटी प्रेमापोटी आणखी उत्कृष्टरित्या समोरील खेळांचे सादरीकरण करेल आणि खेळाच्या शेवटाला तुम्हीही आनंद घेऊन परताल आणि सादरकर्ते समाधानी. यासाठी होतील की सर्वे चेहरे हे आनंद घेऊन गेलेत.
            सादरकरत्यांसाठी थोडं सांगायच झालं तर हेच की, प्रत्येक माणसं ही समजदार असतीलचं असे नाही, नेहमीच आपल्या चुकीला लोक दुर्लक्ष करुन प्रोत्साहन करतील अस होत नाही, मग अशा वेळी काय करायचं, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की, शेवटी ही एक सरकस आहे, त्यात आपण सादरकर्ते आपल्या प्रयत्नाने उत्तोमोत्तम खेळ सादर करत राहायचे, अगदी शेवटापर्यंत. असे करुनही कधी तोल गेलाच तर मग स्वतःच स्वतःच्या मनाला आधी बळकटी द्यायची की काळजी नको करुस सर्व काही ठिक होईलआणि स्वतःला सावरुन समोर जात राहावे. अशा वेळेस काही बघ्यांच्या कुजबुजनं कानावर पडेल मग त्याकडे दुर्लक्ष करणेच  गरजेचे. पुढील खेळ योग्य रितीने पार पाडण्यासाठी शेवटी स्वतःचा आत्मविश्वास जाग्यावर ठेवूनच लोकांचा विश्वास तुम्ही सांभाळू शकता.
            तारेवरची कसरत करता म्हणून तुम्ही सर्कसित नाही तर, सर्मकसमध्ये असल्याने तुम्हाला ते करावं लागतं. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व प्रयोगापर्यंत मर्यादीत असावं आणि तुम्ही दिवस-रात्र सरकसच जगत जरी असाल तरीसुध्दा हे फक्त या सर्कसच्या तंबूपर्यंत मर्यादीत ठेवावं. कारण या तंबूच्या बाहेर विशाल अस जग अवती-भवती पसरलेलं आहे. सर्कसित तारेवर चालतांना तोल गेला म्हणून अस्वस्थ किंवा न्यूनगंड मनात निर्माण करु नका. कारण तंबू बाहेरील जे जग आहे तेथे तुम्हाला तारेवर चालावं लागत नाही त्या जगात चालण्यासाठी सरळ जमीनीवर रस्ते असतात. तेथे तुमचा तोल जाने शक्यच नाही कारण खेळ करतांना तारेवर चालून तुम्ही परीपूर्ण झालेले असता. माहीती आहे तुम्ही तुमचं सर्व जिवन तंबूला, बघ्यांना आणि सर्कसिला बहाल केलं, पण कधी-कधी वेळ मिळेल तेव्हा थोडा तंबूचा पडदा बाजूला करुन बाहेर एक नजर टाकत चला म्हणजे आणखी बरंच काही आहे जगण्यासाठी असं तुमचंच तुम्हाला कलेल. हे सर्व यासाठी करायच आहे. कारण तुम्ही जेव्हा स्वतःला प्रतीसाद द्याल तेव्हा संपूर्ण जग बदलण्याची शक्ती तुमच्यातच आहे हे गुढ तुम्हाला कळेल मग सर्व काही सुरळीत आणि सहजगत्या होईल. अगदी मनासारख. शेवटी सादरकर्तांचे कर्तव्यच आहे की त्यांनी बघ्यांना नेहमी खुप आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चुका आणि शिकत रहा म्हणजे एक दिवस असा नक्की उजाडेल जीथे तुमच्या परिपुर्णतेची कुठेच तुलना केली जाऊ शकणार नाही. आणि मग हे बघे तुमच्या सादरीकरणाने आनंदी तर होतीलच पण जाता जाता तुम्हाला निरोप देतांना डोळ्यांत अश्रु नक्की उभे करतील, हे जो करु शकला ख-या अर्थाने त्याने संपुर्ण सर्कस जिंकली असे म्हणायला हरकतच काय.
            एकदा का सादर कर्त्याला बघ्यांची मने जींकता आली, की मग तोच त्याच्या खेळाला हवा तसा प्रतीसाद बघ्यांकडून मिळवू शकतो. त्याला वाटेल तेव्हा तो बघ्यांना हसवू शकतो, वाटेल तेव्हा रडवू शकतो, वाटेल तेव्हा आपल्या खेळातून, भावूक करु शकतो. म्हणजे एखादी जादूची कांडी फिरवावी आणि सर्व बदलून जावं तसच काहीतरी.
या सर्कसित सादरकर्त्या ह्या माझ्या सर्वं महीला भगीनी आहेत, आणि बघे हे घरातील मंडळी, नातेवाईक आहेत. सर्कसिचा निर्माता हा कुटुंब प्रमुख आहे. ह्या संदर्भातून बघितल्यास हा सर्कसिचा खेळ तुमच्या नक्कीच लक्ष्यात येईल.

--राणी अमोल मोरे



2 comments:

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts