Search This Blog

Monday, June 1, 2020

ओळख..एक स्पर्धा


ओळख...एक स्पर्धा 


     धाव धाव धावत सुटलोय जगाच्या पाठिमागे. धापा टाकल्या, दम लागला, रस्ता विसरला, कुणाचं तर आयुष्यही संपून गेलं, तरी समाधान अजुनही दूरचं दूर. कुठे धावणा-यांचा कळप, तर कुठे ऐकटेच धावत सुटले पिसाळल्यागत. कधी मेंढयांसारखे, कधी कोल्हासारखे तर कधी कुत्र्यांसारखे एक-मेकांचा पाठलाग करत. तो माझ्या बाजूला धावतो, म्हणून मी ही धावायचं त्याच्या पाठीमागे, पण तो कुणाच्या पाठीमागे धावतो, हे त्याला सुध्दा माहीती नाही तो कुणामागे आणि कशासाठी धावतो. ज्याच्या पाठीमागे तु धावत सुटतो आहेस. तीने किंवा त्याने कितीही खोटेपणाचा आव आणुन म्हटलं की मला सर्व माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी करायचं आहे. जसे की समाजासाठी, घरासाठी, परिवारासाठी, मुलाबाळांसाठी किंवा इतर कुणी प्राणी-मात्रांसाठी. जी काही कारणे असतील ती. पण वास्तवाचा सखोल अभ्यास हे सर्व वरील कारणे सांगणारे ते किंवा तीकरतील तेव्हा सत्य परिस्थितीची त्यांना जाण होते की जी कारणे आपण सांगतो त्यापेक्षा आपल्या कारणमिमांसा काही वेगळ्याच आहेत.
हि कारणे आपण तो आणि ती चे उदाहरण देऊनचं स्पष्ट केलेली बरी.
उदा. तो एखाद्या आपल्या श्रीमंत मित्रांच्या पार्टीला किंवा लग्नाला गेला, की त्याची नजर अशा ठिकाणी आधी पोहोचते ज्या गोष्टी पासून हा आजवर वंचीत आहे, जसे की हा पठया जर बँचलर असेल आणि लग्नातील मित्राची नवरी अतीशय सुंदर उच्च घराण्यातील रग्गड पैसेवाली, उच्च शिक्षित असेल व ती त्याच्या मित्राला अजीबात सुट होत नसेल तर,लगेच या पठयाचा कम्पुटर माईंड स्टार्ट होतो आणि विचार करायला लागतो. इतकी जबरदस्त मुलगी या माकडाला सुट तरी होते का? मी असतो, त्याच्या जागी तर आपल्याला नाही मिळू शकणार का अशी पार्टी? पण कशी मिळणार हा माकड फार श्रीमंत आपण साले कंगाल. कोण उभं राहणार आपल्या बाजूला? असा विचार करणारा त्याचा मास्टर माईंड वरवर जरी शट डाऊन दिसत असला, तरी आतून मात्र सुपर कम्पुटर सारखा धावत सुटलेला असतो विचारांच्या मार्गावर. तेच विचार डोक्यात घेऊन बिचारा घरी येतो आणि बस आजपासून आपणही खुप पैसा मिळवायचा, श्रीमंत व्हायचं, एवढंच डोक्यात फिट्ट करतो आणि दुस-या दिवसापासून पैशाच्या मागे धावायला सुरुवात करतो. हे झाले त्याच्या बाबतीत.
आता आपण ति चे उदा घेऊया. समजा ती नुकतीच लग्न झालेली अगदी लाडकी नव-याची बायको. नव-याने कधी कधी तीला खुष ठेवण्यासाठी ब-याच बढाया मारलेल्या असतात, तू हुशार मुलगी, सर्व काही योग्य रितीने मॅनेज करतेस. तू तर कुठल्या एका मोठ्या इनस्टीट्युट ची मॅनेजर असायला पाहिजे. असेच  दिवस निघुन जातात. एखादवेळी ती संतापते, ते पाहून बाईचा नवरा भडकतो. सप सप पाच सहा तीच्याकानाखाली वाजवतो आणि म्हणतो एक नालायक आहेस तू, कसलीच लायकी नाही तुझी, बायको होणाची किंवा या घरची सुन होण्याची. तू मला सांभाळू शकत नाही, माझ्या घरच्या लोकांना सांभाळू शकत नाही, तू काय एखादी कंपनी सांभाळशील. मग काय हे ऐकताच सत्य परिस्थितीची जाणीव (येथे सत्य परिस्थिती म्हणजे ती अयोग्य आहे असे नसुन आपला नवरा आज पर्यंत आपल्याला फक्त हरबऱ्याच्या झाडावर चढवत होता ही सत्य परिस्थिती तीच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा) बाईच्या पायाखालची जमीन गायब होते. तोंडात शब्दच उरत नाहीत, डोळे सुन्न, शरीर, आत्मा मेल्यागत होतो. या सर्व परिस्थितीतून ती सैरावैरा होते. तिला आपल्यावर लावलेला हा कलंक काढायचा असतो. तीला स्वतःला सिध्द करायचे असते. म्हणून ती ही धावत सुटते. एखाद्या अशा गोष्टीमागे की त्यातून स्वतःला परिपुर्ण आणि सर्व गोष्टीच्या लायकीची फक्त तीच आहे. हे सिध्द करण्यासाठी, हे झाले तीचे आणि त्याच्या धावण्याची खरी कारणे. स्वतःला सीध्द करणे आणि स्वतःच्या आनंदासाठी खुप काही मिळविणे यासाठी. पण यापलीकडे थोडे खोलात आपण जाऊया आणि हे पडताळून पाहूया की ही जी दोन खरी कारणे आपण या तो व ती च्या बाबतीत मांडली आहे ती खरचं खरी आहेत की बरेच काही.चला तर मग हे ही आपण पडताळून पाहू.
त्याचे उदा. परत पडताळनीसाठी घेतल्यास असे लक्षात येते की तो पैशामागे धावणारा नव्हता किंवा त्याला जे हवं होत ते पैशातूनच मिळते, याबाबतीत तो गोंधळलेला होता, म्हणजे श्रीमंत लोकांचा थ्याट बघुन आपल्याला हवाहवासा आहे व त्यासाठी पैसा आवश्यक आहे याची जाणीव त्या पार्टीने किंवा लग्नाने त्याला करुन दिली त्याआधी तो याबाबतीत अज्ञानी होता. स्पष्टपणे हेच म्हणता येईल की, त्याआधी तो त्याच्या मनाच्या एखाद्या गोष्टीमागे धावत असेल किंवा धावतही नसेल, निवांत असेल किंवा आणखी काही वेगळी कारणे असतील त्याच्या धावण्यामागची, पण पैसा मुळीच नाही. तिच्याही बाबतीत सांगायचे झाले तर असेच की. प्रत्यक्षात तिला धावायचं होत कशासाठी पण त्या परिस्थितीने तिला जे कारण दिलं आज त्याच कारणामागे धावते आहे ती.
थोडक्यात काय, जर एखादं कुत्र्याचं पिलू आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा खेळ खेळ म्हणून धावत असेल ऐका दिशेने आणि अचानक एका दुस-या कुत्र्याने त्याला चावा घेतला आणि पळून गेला तर हा त्याला चावण्यासाठी त्यामागे त्याच्या दिशेने धावायला लागतो. आधीच्या धावण्याचे कारण विसरुन तो चावणे या कारणासाठी त्याच्यामागे धावत सुटतो. म्हणजे काय प्रत्येक वेळेस परिस्थिती ही तुमची ऑन युअर मार्क ठरवत असते ती खरचं मार्क योग्य आहे किंवा नाही हे तुमचेच, तुम्ही ठरवून स्वतःला गेट सेट गो म्हणायचे की नाही ठरवायचे असते.
समाधानासाठी धावायचं असेल तर स्वतःसाठी धावणे थांबवा व स्वतःसाठी धावायचे असेल तर समाधान विसरा. स्वतःसाठी धावणे थांबवले ना, की धावतांना लागणारा दम, आडकाठीचा  रस्ता ह्या गोष्टी समाधान मिळविण्यासाठी अडथळा निर्माण करत नाहीत.म्हणून आयुष्यात एखाद्या गोष्टीमागे धावून आपली ओळख निर्माण करतांना त्याचा उद्देश आणि समाधान याचा विचार आधी नक्की करा.

-    --- राणी अमोल मोरे
-



No comments:

Post a Comment

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts