Search This Blog

Wednesday, May 6, 2020

तुम्हीच आहात सर्व..!


तुम्हीच आहात सर्व..!


तुमच्या सारख्या नव तरुणाई, नवं चेतन्याने बहरलेल्या सळसळत्या रक्ताने ध्येय प्राप्तीसाठी पेटून उठलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींसाठी मला विचार व्यक्त करण्याची संधी मिळणे हे भाग्यच.
माझ्या मते प्रत्येक व्यक्ती एखादी नवीन गोष्ट करण्यास घाबरण्यामागे त्या गोष्टीबद्दल असलेले अपूर्ण ज्ञान, माझी क्षमताच नाही असा प्राथमिक गैरसमज आणि सुरु केलेल्या गोष्टीत अपयशी होण्याची मानसिक भीती इत्यादींचा प्रामुख्याने समावेश असतो. परिणामी आपण एखादी नवीन गोष्ट सुरु करण्या आधीच तिला संपवून टाकतो. असेच आपल्या आयुष्याच्या ध्येयाबरोबर देखील आपण करीत असतो. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण सर्वप्रथम ठरविले पाहिजे कि, मला काय साध्य करायचे? (What is my goal?) माझी क्षमता काय? (What is my Capability?), मी ती कशी वाढविणार? (How I increase it?) व ते मी कसे साध्य करणार? (How do I achieve it?) माझ्या मते सुरवातीला तेच ध्येय ठेवा, जे तुम्ही गाठण्यात सवतःला पात्र समजता. सांगायचे तात्पर्य एवढेच कि सुरवात त्याच ध्येयाची करा, त्याच गोष्टींची करा ज्या तुम्ही वेळेत साध्य करू शकता कारण वेळेनुसार गरजा, आवडी-निवडी बदलत असतात.
         समजण्यासाठी उदाहरण पाहू, समजा आज रोजी मी माझं ध्येय निश्चित केलं कि मला इंग्लिश खाडी पोहून पार करायची आहे (This is my Goal) हे ध्येय साधण्यासाठी मला इंग्लिश खाडीचे अंतर माहिती करावे लागेल, माझी पोहण्याची क्षमता बघावी लागेल, परंतु मला कळलं कि मी पोहुच शकत नाही किंवा मला पोहणे येत नाही तर ते मी कसे साध्य करणार? (How can I achieve my goal?) मग माझ्या ध्येय पूर्तीसाठी मला नक्कीच नियोजन करावे लागेल. मुख्य ध्येयाला गाठण्यासाठी उपमुख्य ध्येय (Sub Goals for Main Goals) ठरवावे लागतील. अर्थातच पोहणे शिकणे, सुरवातीला उथळ पाण्यात, हळू हळू खोल पाण्यात, व नंतर पोहण्याची क्षमता वाढविणे व त्याकरिता नियमबद्ध रोज सराव करणे आज १ तास, उद्या २ तास अशी क्षमता वाढवून वेग वाढवावा लागेल. म्हणजेइंग्लिश खाडी पोहून पार करण्याचे माझे ध्येय सुरवाती पासून ते साध्य करण्यापर्यंत मधल्यावेळेत उपमुख्य ध्येय ठरवून ते गात पुढे मुख्य ध्येयाकडे वाटचाल करावी लागेल. जेणेकरून माझे ध्येय साध्य करतांना कटिबद्ध नियोजनामुळे माझी अपयशी होण्याची टक्केवारी नक्कीच कमी होईल आणि मानसिक दडपण कमी होऊन माझे ध्येय वेळीच साध्य होईल.
परंतु हे सर्व साध्य करत असताना मला प्रत्येक क्षणात आनंद घ्यायचा आहे. ध्येय पुर्तीचा प्रवास आनंदात पूर्ण करायचा आहे. प्रत्येक गोष्ट करत असताना १००% करायची आहे. जर ध्येय साध्य झालं नाही तर समजायच कि आपण १००% दिलेच नाही आणि हे सर्व करत असताना अपयशी झालो तर हताश होण्याचे कारण नाही कारण जीवनाचं वास्तविक सत्य हे आहे की माणसाच्या आयुष्यात यशा पेक्षा अपयश जास्त महत्वाचं कारण जिकंण्याचे जास्त महत्व तोच समजू शकतो, जो हरला आहे. कारण अपयश माणसाच्या उणीवा संपवण्यात त्याला मदत करते. मी तर समजते अपयश हा माणसाचा शिक्षक आहे जर तुम्ही पुनः प्रयत्न कराल (Failure is your best teacher, if u try again for success).
आज आपण काही जगप्रसिद्ध लोकांचा विचार केला तर काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत जे सुरवातीपासून अपयशी झालेच नाहीत. परंतु अशी कितीरी नावे पहायला मिळतील जे लोक त्यांच्या ध्येयपूर्तीच्या सुरवातीला एक नाही, दोन नाही, तर अनेक वेळा अपयशी (Fail) झालेत तरी देखील ते आज त्यांच्या यशामुळे (Success) मुळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध (World popular) आहेत.
आपण हेनरी फोर्डचं उदाहरण घेऊयात हेनरी फोर्ड हे बिलेनियर आणि जगप्रसिद्ध फोर्ड मोटार कंपनीचे मालक आहेत. परंतु हे यश मिळविण्या आधी हेनरी फोर्ड पाच वेगवेगळ्या व्यवसायामध्ये (In Business) अपयशी झाले होते आणि कर्जा मध्ये बुडाले होते. तरीसुद्धा ते आज एका बिलेनियर कंपनीचे मालक आहेत. अयशस्वी होण्याची गोष्ट करायची झाली तर शास्त्रज्ञ एडिसन एक नंबरवर येतील. तुम्हाला माहित आहे, एडिसन ने विजेच्या दिव्याचा  शोध लावला परंतु विजेच्या दिवा बनवण्याआधी त्याने जवळपास १००० अयशस्वी प्रयोग केले होते. अल्बर्ट आईन्स्टाईन ४ वर्षापर्यंत बोलू शकत नव्हता आणि वयाच्या ७ वर्षापर्यंत निराधार होता. लोकांनी त्याला मंदबुद्धी म्हणून चिडवायला सुरवात केली होती. परंतु तो आज आपल्या सिद्धांतामुळे जगातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ बनला. थोडा विचार केला की जर, हेनरी फोर्ड पाच व्यवसायांमध्ये अपयशी झाल्यावर हताश होऊन बसला असता, एडिसन अयशस्वी प्रयोगामुळे अपेक्षाहीन झाला असता आणि आईन्स्टाईन सवतःला मतीमंद समजून चुपचाप बसला असता तर काय झालं असत? आपण सर्व यांच्या महान विचारांपासून आणि वेगवेगळ्या आविष्कारापासून वंचित राहिलो असतो.
कुठलेही कार्य करायला जेव्हा सुरवात कराल निश्चितच त्यामध्ये अनेक अडथळे येतील. मला येथे स्वामी विवेकानंदाचे विचार आठवतात ते म्हणतात कुठलेच कार्य अडथळ्याशिवाय पार पडू शकत नाही, शेवट पर्यंत जे प्रत्यन करतात, त्यांनाच यश प्राप्त होते. तुमच्या मार्गावर अडथळे आले नाहीत, तर समजा तुम्ही मार्ग चुकलात. आलेल्या अडथळ्यांना पार करत पुढे जाण्यातच यश आहे. परंतु आपण अडथळ्यातच गुंतून पडतो म्हणूनच हेनरी फोर्ड म्हणतात Most people spend more time and energy going around problems than in trying to solve them.” म्हणजे बरेच लोक समस्या सोडविण्या पेक्षा त्यामध्येच गुरफटून जास्त वेळ आणि ताकद वाया घालवितात.” बिल गेट त्यांच्या अनुभवावरून सांगतात की एखादी समस्या आल्यानंतर जुने लोक विचारतात की हे काय आहे? परंतु नवीन लोक विचारतात आपण याला कसे निपटु शकतो? हे सांगण्यामागे उद्देश एवढाच की आपण सर्व नव्या पिढीचे नवे तरुण आहात, आपणही स्वतःची नवी संज्ञा दाखवावी व एखादी समस्या आल्यानंतर हि काय आहे? (What is this) विचारण्यापेक्षा आपण याला कसे सोडवू? (How we solve it?) कारण हेच तरुणांचे लक्षण आहे.
 मला तुमच्या बरोबर एक गोष्ट नक्की शेअर करायला आवडेल कारण ती तुमच्या सर्वांसाठी फार महत्वाची आहे. आयुष्याचं म्हणजेच जिवनाचं एक गुपित (Secret) असतं ज्याला ते कळलं आणि ज्यांनी त्याचा विचार केला तो नक्कीच यशस्वी होतो. तुम्हा सर्वाना डॉ. वामनराव पै यांचे एक वाक्य आठवत असेल “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार”. माझ्या मते हे १००% सत्य आहे, कारण प्रत्येक मनुष्य स्वत:चे भविष्य घडविण्यास स्वत:च जवाबदार असतो. आता तुम्ही म्हणाल नाही, आम्ही करू शकलो असतो पण आमची आर्थिक परिस्थिती वाईट होती, कोणी म्हणेल मला काय करायचं हे कोणी सांगितलच नाही. तर कोणी म्हणेल माझ्याकडे वेळच नव्हता. असे अनेक करणे दाखवून आपण स्वत:ला, नशिबाला, इतरांना, परिस्थितीला दोष देतो व आपल्या कर्मावर पडदा टाकून सहानुभूती मिळवितो. परंतु, परिस्थितीचा विचार तुमच्या आमच्या सारखे डॉ. अब्दुल कलाम करत बसले असते तर मिसाईल मेन (Misile Man) आपण त्यांना म्हटलं नसतं. अयशस्वी माणसे झोपेत स्वप्न बघतात व जागे झाले कि विसरतात परंतु डॉ. कलामांना त्यांची स्वप्ने झोपूच देत नव्हती. यशस्वी आणि अयशस्वी माणसांमध्ये एकाच गोष्टींचा फरक असतो तो म्हणजे विचार (Thoughts) म्हणूनच Always think positive and  Always think big. परंतु चांगले विचार तेव्हाच येतील, जेव्हा आपण चांगल्या वातावरणात, चांगल्या संगतीत, चांगल्या माणसात राहू, चांगले ऐकू, चांगले वाचू आणि चांगले बघू म्हणून नेहमी प्रयत्न करायचा कि जी माणसे आपल्याला निरुत्साही (Demotivate) करतात त्यांच्या पासून सदैव दूर राहण्याचा. जी गोष्ट आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेण्यास परावृत्त करेल त्यापासून दूर राहण्याचा.
उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ध्येयप्राप्ती होत नाही तुम्हाला चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य माहितीच असतील. चंद्रगुप्त म्हणतात "किस्मत पहले हि लिखी जा चुकी हे, तो कोशिश करणेसे क्या मिलेगा." त्यावर चाणक्य म्हणतात "क्या पता किस्मत मे लिखा हो, की कोशिश करणे से हि मिलेगा." चाणक्याचे हे वाक्य आपल्याला खूप काही शिकवून म्हणून जी महान व्यक्तिमत्वे होऊन गेलीत त्यांचे विचार आपण नक्कीच वाचले पाहिजेत. कारण त्या विचार शक्तीच्या जोरावर हि सामान्य माणसे इतिहासात असामान्य होऊन अजरामर झालीत.
आपण आज स्वत:ची आणि इतरांची वर्तमान स्थिती काय आहे यावरून स्वत:च्या किंवा इतरांच्या भविष्याचा अंदाज घेत बसण्यापेक्षा काळाप्रमाणे कर्म करत राहावे. कारण काळ अशी शक्ती आहे जी कोळश्याच्या तुकड्याला हिरा बनवू शकते. म्हणून स्वत:ला कधी कमी लेखू नका. तुम्ही अनंत आत्मा आहात, ज्यासाठी काहीच अशक्य नाही. सर्व शक्ती आपल्या मध्येच आहेत. आपण फक्त त्या ओळखून स्वत:ला पारखण्याची गरज आहे, म्हणजे तुमचे मोल जगाला कळेल.
कधीकाळी मला एखादी गोष्ट येत नव्हती म्हणजे आजही येणार नाही आणि प्रयत्न न करताच ती गोष्ट सोडून देणे मूर्खपणाचे ठरेल कारण माणसाच्या क्षमता ह्या वेळेनुसार वाढत जातात. यासाठी मला एक गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल हत्तीचे पिल्लू लहान असते तेव्हा कमजोर असते. तेव्हा त्याला दोरीने बांधून ठेवतात. तो दोरी तोडण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु दोरी तुटत नाही. कालांतराने हत्ती मोठा होतो. परंतु तो दोरी तोडण्याचा प्रयत्न करीत नाही. कारण त्याने त्याचा डोक्यात पक्के बिंबवले असते कि हि दोरी आपण तोडूच शकत नाही. परंतु त्याला तो आज किती मोठा आहे किंवा जगातल्या बलवान प्राण्यांपैकी एक आहे याची जाणीव नसते. त्याच्या थोड्याश्या प्रयत्नातही दोरी आरामात तुटू शकली असती, परंतु तो प्रयत्नच करत नाही. हत्तीसारखे आपल्याही बाबतीत होऊ नये यासाठी आपण प्रत्येक वेळेस प्रयत्न केलेच पाहिजे कोणाला माहित तोच प्रयत्न आपल्याला अपयशापासून मुक्त करेल व याश्याच्या उच्च शिखरावर घेऊन जाईल. म्हणून लक्षात ठेवा कोई भी लक्ष्य बडा नही, जिता वही जो डरा नही”.
*****


No comments:

Post a Comment

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts