Search This Blog

Wednesday, May 6, 2020

काय देणार आम्ही आमच्या नवीन पिढीला..?


काय देणार आम्ही आमच्या नवीन पिढीला..?

काय देणार आम्ही आमच्या नवीन पिढीला? हा प्रश्न आमच्या प्रत्येक पाल्याच्या पालकांना भेडसवायलाचं हवा. कारण का तर सांगते ऐका माझ्या सर्व बंधू-भगिनींनो, काका-काकुंनो, आजी-आजोबांनो, नाना-नानिनो, शेजाऱ्या-पाजाऱ्यांनो, सर्व Whats App Ggroups वाल्यांनो, सर्व राजकारण्यांनो  आणि समाजकारण्यांनो व उरलेल्या खाजगी-शासकीय कर्मचारी मित्रांनो आणि सर्व News Channal वाल्यानो.

मला सांगा, कुठे निघालो आहोत आपण हे सर्व जातिपंथांचे धर्मांध शक्तीचे लठ्ठ ओझे घेऊन. काही ध्येय आहे का आपण सर्वांचं ? असेल तर मला ही कळू द्या. आपल्या सर्वांच्या पाल्याच्या स्वरूपात ही जी सर्व नवीन फुले उगवली आहेत, त्यांची कशी निगराणी करतो आहोत आपण, एक जबाबदार भारत देशाचा नागरिक म्हणून कसे घडवत आहोत आपण या शिशु भारताला. केला का विचार, नाही ना ? मग करा ! T.V. Channals, वृत्त पत्रे, Whats App गृप, फेस बुक, होर्डींग्ज, रोड, शहर, गल्ली, घर सर्व स्थळे ही जातीपातीच्या खेळात गुरफटलेली आहेत आणि उरलेली जागा व्यापारी मंडळींनी त्यांचा व्यापार वाढवण्यात व त्यासाठी प्रत्येक ठिकाणी  मोठ मोठे शॉपिंग मॉल्स व दुकाने उभारण्यात व्यापून टाकली आहे. हे हि करा, काही हरकत नाही. पण कोणालाच असे वाटत नाही की प्रत्येक क्षेत्र, विभाग, परिसर निहाय काही सायन्स सेंटर निर्माण करावे ? मुंबई  सारख्या महानगरात तुरळक २-३ ठिकाणी नेहरू सायन्स केंद्रा सारखे सायन्स सेंटर सोडले तर लहान मुलांवर आधुनिक विज्ञानाचे सुसंस्कार घडावेत, त्यांची जडण घडण मुळात विज्ञानाच्या भक्कम पायावर उभी करावी असे प्रयत्न कोठेही होतांना दिसत नाहीत. 

या लहानग्यांचे डोके सध्या रिकामे आहेत. कशाला त्यात जातीपाती धर्माचे, आरक्षणाचे व आंदोलनाचे म्हणजे रस्त्यावर उतरून मोटारी जाळणे, दगड फेक करणे, असली कटू बीजे  रुजवत आहात. बस झाले या जातीपातींच्या जाळ्यात अडकणे. कंटाळा येतो तेच तेच यॆकून आणि बघुन. मुलांवर सुसंस्कार होण्यासाठी पालक, घर, शाळा आणि समाज कारणीभूत असतो. मुले जे बघतात, जे यॆकतात आणि मोठी मंडळी जे करते तेच बघून अनुकरण करीत असतात. सुट्टीच्या दिवसात मॉल्समध्ये जाणे शोपिंग्स करणे, डॉमिनोज मध्ये जाऊन पिज्जा खाणे हे सर्व चालणारच. पण मुलांच्या बुद्धिला ने गळी चालना देण्यासाठी काय करतो आहोत आपण सर्व. मला सांगा ज्या जमिनीवर पाय रोवून आरक्षण मागतो, जातपात करत सुसाट सुटतो, ती किती दिवस पाया खाली असेल याची कल्पना तरी आहे का कुणाला. तुमच्या माझ्या सारख्या सामान्य लोकांना निसर्गाचे सूत्र कळणं कठीणच. मग म्हणून काय नवीन पिढीला आपल्यासारखे अंधारात ठेवायची, आपली बुद्धी जकडली गोठली जातीपातीमध्ये, म्हणून काय मुलांच्या विचारांची गती कमी करण्याचा विचार आहे की काय ? नाही ना ! मग जागे व्हा ! सकाळ नाही, संध्याकाळचा सूर्य आहे तो ! सारं जग मागून पुढे सरसावत आहे. नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन शोध मोहीम यामध्ये त्यांनी त्यांच्या नवीन पिढीला बसवलं आहे. आज लहान मुलांसाठी योग्य आणि माहितीपूर्ण सुसज्य मंच केव्हाच तयार आहे. त्याचा २१ व्या शतकात महत्वाचा रोल असून जगाशी संपूर्ण जवळीक असूनही जग किती पुढे जात आहे हे कळूनही न कळण्यागत आपण वागने बरे नाही. फक्त इंग्रजी शाळेमध्ये टाकून इंग्रजी खाडखाड बोलून किंवा जीन्स टी-शर्ट घालून आपण आधुनिक झालो असं नाही, त्यासाठी आपल्याला मुळापासून तयारी करावी लागते. आपल्या पाल्याच्या बुद्धीला आणि विचाराना वैज्ञानिक दृष्टीकोन देण्यासाठी कुठले प्रयत्न आपण करू शकतो, समाजामध्ये काय परिवर्तन घडवू शकतो, याचा विचार करण्यासाठी एकदा तरी सर्व एकत्र या ! जातीनिहाय निघणाऱ्या मोर्चांची संख्या लाखोंच्या घरात आहे,  सांगण्या पेक्षा वैज्ञानिक दृष्टीकोन करोडोंच्या मनात कसा रुजेल याचा प्रचार व प्रसार करा ! कारण, आज आपल्या देशाला कुठल्याही आधुनिक शस्त्रांस्त्रांसाठी असो, कुठल्या नवीनतम तंत्रज्ञानासाठी असो वा कुठल्या प्रगत धोरणासाठी असो इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं. भरगच्च लोकसंख्येच्या या देशात कुशाग्र पाच पन्नास वैज्ञानिक घडू नयेत, वर्षाला ४-५ कोणतेही नाविन्यपूर्ण शोध लागू नये हे नवलच. कधी रशियाचं तंत्रज्ञान तर कधी अमेरिकेचं, फ्रान्सचं अरे आपण काय करतो ? आपल्या मुलांमध्ये पण आहेत कुशाग्र भावी वैज्ञानिक. फक्त ते घडविण्यासाठी व  जोपासण्यासाठी योग्य वेळेला योग्य खतपाणी घालण्याची गरज आहे. उठा सर्व जवाबदार नागरिकांनो बघा फुल कोमजण्या आधी जपा त्याला आणि येउद्या भावी आधुनिक भारताचे गोड फळे, म्हणजे परावलंबी वृत्तीतून बाहेर पडून भारत देखील स्वावलंबी बनेल. आपल्या पुरोगामी समाजसेवकांनी व स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वावलंबन शिकवलं. चला स्थापन करूया भारत स्वावलंबन मिशन, करूया नवीन तंत्रज्ञान निर्माण, लावूया नाविन्यपूर्ण शोध व त्या करिता उभे करूया ठीक ठिकाणी विज्ञान सेंटर आणि घडूद्या उद्याचे चंद्रशेखर, रमन, कलाम. कळूद्या जगाला हा देश फक्त साप सपेऱ्यांचाच नसून विज्ञानाचा देश देखील आहे.

- राणी अमोल मोरे 
***



No comments:

Post a Comment

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

तू राजा मी सेवक (Vol-2)

- रानमोती / Ranmoti

Most Popular Posts